उपराजधानीक्राइमन्याय-जगत

बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्याचा निर्णय आज

नागपुर,दिनांक १३ जुलै २०२३: बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्याचा निर्णय आज दिनांक १४ जुलै रोजी ठेवण्यात आलेला आहे , निर्णयाकडे जनतेचे लक्ष लागले आहे.विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे डीजे १० श्री. एस. बी. गावंडे यांच्या न्यायालयात कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्यात सरकारतर्फे व आरोपी तर्फे अंतिम युक्तिवाद झाला. या प्रकरणात फिर्यादी रवीकांत कांबळे यांची आई व दीड वर्षाच्या मुलीची १७ फेब्रुवरी २०१८ रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

तपासात एकूण चार आरोपी निष्पन्न करून एसीपी बनसोड कोतवाली यांनी दोषारोप पत्र दाखल केले होते .युक्तीवादा दरम्यान विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी असे सांगितले, की आरोपी विरुद्ध सरकार पक्षाने पुरावा कायद्याचे अनुषंगाने सबळ पुरावे कोर्टा समोर सिद्ध केले .

या प्रकरणात सरकारतर्फे एकूण ३५ साक्षीदार पडताळण्यात आले आहे. युक्तीवादाचे मुख्य मुद्दे उज्वल निकम यांनी मांडले. त्यात आरोपींच्या राहत्या घरात व त्यांच्या स्वतःच्या चार चाकी महेंद्र एक्सयूव्ही ५०० गाडीतून, उषाबाई कांबळे व राशी कांबळे यांचे रक्ताचे डाग मिळून आले तसेच घरातून व गाडीतून मिळून आलेले रक्ताच्या डागाच्या नमुनाच्या अहवाल फॉरेन्सिक चाचणी मध्ये उषाबाई कांबळे यांचा डीएनए सोबत जुळून आल्याचे निष्पन्न झाले आहे असा सुद्धा युक्तिवाद करण्यात आला .

इतर अनेक मुद्द्यावरून विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्याद्वारे युक्तिवाद करण्यात आला जसे की प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी आरोपी गणेश शाहू, अंकित शाहू, गुडिया शाहू यांना घटनेच्या दिवशी दुकानात पाहिले तसेच काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपींना दोन पोते आरोपीच्या घरच्या जिन्यावरून खाली उतरवून गाडीत टाकताना आणि त्यानंतर ते पोते विहिरगाव नाल्यात फेकताना साक्षीदारांनी पाहीले .

आरोपींनी खून करून पुरावा सुद्धा नष्ट केलेला आहे असा युक्तिवाद करण्यात आला , तसेच मृतक उषाबाई कांबळे यांच्या अंगावरील दागिने हे आरोपी अंकितने अटक झाल्यानंतर लपवून ठेवलेल्या ठिकाणावरून काढून दिले होते हे सुद्धा साक्षीदारांच्या पुराव्यात कोर्टा समोर सिद्ध झालेले आहे असा युक्तिवाद करण्यात आला.

आरोपींकडून मृतक उषाबाई कांबळे यांचा मोबाईल व आरोपीने वापरलेले शस्त्र साक्षीदारांच्या समक्ष आरोपी गणेशने फेकलेल्या ठिकाणावरून काढून दिले हे कोर्टा समोर साक्षीदारां मार्फत सिद्ध झाले आहे, असा युक्तिवाद करण्यात आला तसेच सरकार पक्षाने डॉक्टरांचा वैद्यकीय अधिकारी यांच्या पुराव्याच्या आधारे जप्त शस्त्राद्वारे मृतांच्या शरीरावर जखमा होणे शक्य आहे हे कोर्टा समोर सिद्ध केले असा युक्तिवाद करण्यात आला.

युक्तिवादाच्या अंतिम टप्प्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी माननीय कोर्टाला असे सांगितले,की सर्व आरोपींनी सूडबुद्धीने ,गुन्हेगारी कट रचून ,संगमताने दिड वर्षाच्या चिमुकली मुलीचा व तिच्या आजीचा गळा कापून निर्घृणपने खून करून त्यांचे प्रेत पोत्यात टाकून गाडीत भरुन नाल्यात फेकले व पुरावा नष्ट केला.

आरोपी अंकित शाहू, गुडिया शाहू व विधी संघर्ष बालकतर्फे आरोपींची वकील आर.एम. भागवत यांनी संगितले की सरकार पक्षाने न्यायालयात आरोपीच्या विरोधात जी बाजू मांडली ती पूर्णपणे खोटी आहे ,सरकार पक्षाने न्यायालयासमोर जे पुरावे सादर करण्यात आले आहे ते सुद्धा खोटे आहे, हा खुन आरोपींनी केलाच नाही असा त्यांनी युक्तिवाद करुन आरोपींची बाजू मांडली.

तसेच आरोपी गणेश शाहु तर्फे एडवोकेट चांदेकर यांनी आरोपीला वाचविण्यासाठी न्यायालयाला हे सांगितले की सरकारतर्फे आरोपींच्या विरोधात जे पुरावे सादर केले ते सर्व खोटे आहेत , परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी ही पूर्णपणे जुळून येत नाही ती साखळी ब्रेक होत आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.

त्यावर दिनांक १० मे २०२३ रोजी सरकारतर्फे ॲड. उज्वल निकम यांनी न्यायालयात काउंटर रिप्लाय दिला व लिखित सबमिशन सुद्धा दिले, न्यायालयाला असे सांगितले की कांबळे दुहेरी हत्याकांड केसमध्ये आरोपींचा कसा समावेश आहे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी तसेच रासायनिक पुरावा म्हणजे डीएनए आरोपींच्या घरात तसेच आरोपींच्या गाडीत कसा आला याचे उत्तर साक्षपुराव्यात आरोपींनी कुठल्याही प्रकारे दिले नाही .

बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडाचा युक्तिवाद सरकारतर्फे तसेच आरोपींच्यावतीने संपला आहे हा युक्तिवाद जिल्हा व सत्र न्यायाधीश डीजे १० एस. बी. गावंडे यांच्या कोर्टात झाला व लवकरच कांबळे दुहेरी हत्याकांड खटलेचा निर्णय येणार आहे, खटल्याच्या निर्णयावर जनतेचे लक्ष लागलेले आहे.

सदर खटल्यात सरकार तर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम,फिर्यादी रविकांत कांबले, ॲडवोकेट समीर सोनवणे तसेच आरोपी तर्फे आर.एम. भागवत व ॲडवोकेट अनिरुद्ध चांदेकर यांनी बाजु मांडली तसेच ह्या खटल्यात लेखनिक म्हणून नायक पोलीस कोन्स्टेबल हर्शदिप खोब्रागडे यांनी काम बघितले.

……………………………….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *